उस्मानाबाद/प्रतिनिधी- महाराष्‍ट्र राज्‍यात दि. 13 मार्च 2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अमलबजावणी  सुरु झाली आहे.  या अधिनियमा अंतर्गत खंड 2 ,3 व 4 नुसार प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकारा नुसार कोरोना विषाणू  (COVID-19) या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी विविध आदेश निर्गमित करण्‍यात आलेले आहेत.
          सद्य परिस्थितीत उस्मानाबाद जिल्‍ह्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. सदर रुग्णापैकी बहूसंख्‍य रुग्‍ण हे उस्‍मानाबाद जिल्‍ह्या बाहेरुन आलेले होते.  त्‍याच बरोबर इतर राज्‍यातून व जिल्‍ह्यामधून प्रादुर्भाव क्षेत्रातून, शहरातून  परवानगी घेवून मोठ्या प्रमाणात नागरिक उस्‍मानाबाद जिल्‍ह्यामध्‍ये प्रवेश करत आहेत.  अशा लोकांना गृह, संस्‍थात्मक विलगीकरण कक्षामध्‍ये ठेवण्‍यात आलेले आहे.  संशयित रुग्‍णांचे कोविड-19 च्‍या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करण्‍याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.       
 त्‍यामुळे बाहेरुन आलेल्‍या नागरिकांच्‍या बाबतीत गृह, सं‍स्‍थात्‍मक विलगीकरणा बाबत खालील प्रमाणे निर्देश करण्‍यात येत आहे. 
दि. 10 मे, 2020 नंतर व यापुढील काळात राज्‍यातील इतर जिल्‍ह्यातून जसे की,  मुंबई महानगर प्राधिकरण (MMR), पूणे महापालिका व पूणे महानगर प्राधिकरण  (PMR) औरंगाबाद महानगर पालिका तसेच राज्‍यातील इतर जिल्‍ह्यामधील Containment Zone (प्रतिबंधित) ) मधून आलेल्‍या नागरिंकावर विशेष लक्ष देण्‍यात यावे व त्‍यांचे दैनंदिन तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करावी.मुंबई महानगर प्राधिकरण (MMR), पूणे महापालिका व पूणे महानगर प्राधिकरण  (PMR),  औरंगाबाद महानगर पालिका तसेच राज्‍यातील इतर जिल्‍ह्यामधील Containment Zone ( प्रतिबंधित) क्षेत्रामधून त्‍या-त्‍या प्राधिकाऱ्यांची परवानगी घेवून येणारे नागरिक आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये आल्‍यानंतर त्‍यांचा तात्‍काळ युध्‍दपातळीवर शोध घेवून त्‍यांना संबंधित स्‍वतंत्र व सुरक्षित  Quarantine केंद्रामध्‍ये व्‍यवस्‍था  वेगळयांने करावी. त्‍यांना पूर्वीच्‍या Quarantine सेंटर मधील नागरिकामध्‍ये  ठेवण्‍यात येवू नये.
इतर जिल्‍ह्यातून आपल्‍या जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची वाढती आकडेवारी लक्षात घेता तालुका मुख्‍यालयी स्‍वतंत्रपणे (पूर्वीचे Quarantine Center वगळून) सुरक्षीत ठिकाणांची निवड करुन त्‍याठिकाणी अशा नागरिकांना ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी.  अशा ठिकाणी  सर्व सोयी-सुविधा मिळणे बाबतची खात्री करण्‍यासाठी प्रत्‍येक Institutional Quarantine सेंटर साठी विविध विभागाच्‍या अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात यावी. तसेच प्रत्‍येक Quarantine  सेंटरसाठी विविध विभागापैकी एका अधिकारी यांची समन्‍वय अधिकारी म्‍हणून नियुक्‍ती देण्‍यात यावी.Institution Quarantine ची जागा निवडताना तेथे ठेवण्‍यात येणाऱ्या नागरिकांना स्वतंत्र तसेच सर्व व्‍यवस्था मिळू शकेल ( पिण्‍याचे पाणी, वापरण्‍याचे पाणी, जेवण, Toilets, वैद्यकीय सुविधा- तपासणी इ. याची    खात्री करावी) .इतर जिल्‍ह्यातून पास घेवून आलेल्‍या नागरिकांपैकी लक्षणे नसलेल्‍या लोकांना Home Quarantine करताना ते ज्‍या घरामध्‍ये राहतात त्‍या घरातील सर्वांनाही Home Quarantine करण्यात यावे, तसे त्‍यांच्‍या हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. Home Quarantine चे नियम अत्‍यंत कडक स्‍वरुपामध्‍ये अंमलबजावणी करण्‍यात यावी. विनापरवाना प्रवेश करणारे नागरिक आढळल्‍यास त्‍यांचा शोध घेवून त्‍यांच्यावर नियमाप्रमाणे  दंडात्‍मक कारवाई करुन त्‍यांना वरीलप्रमाणे Quarantine करण्‍याची कारवाई करावी.    
वरील सर्व निर्देशांचे योग्‍य व काटेकोर अंमलबजावणी करुन Incident COMMANDER म्‍ह‍णून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांचे आदेश निर्गमित करुन  सर्व कार्यवाही युद्ध पातळीवर पूर्ण करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
 
Top