धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते

सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. पाहणीदरम्यान प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून घ्यावेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्वरीत कार्यवाही करावी. शासनाने ज्या निकषांनुसार मदत देणे अपेक्षित आहे, ते निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

शेतकरी हे आपल्या राष्ट्राचे कणखर आधारस्तंभ असून त्यांच्या घामाने सिंचन झालेल्या मातीतूनच महाराष्ट्राची भाकरी तयार होते. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचे हात पुढे करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 
Top