तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव - तुळजापूर मार्ग  लातुर -नळदुर्ग-सोलापूर कडे जाणाऱ्या तुळजापूर खुर्द पुलाजवळ एका बाजुचा बायपास सर्व्हीस रस्ता  किमान पाच ते सहा फूट पाण्याखाली गेल्याने  याचा फटका या बायपास रस्त्यावरून जाणाऱ्या  वाहन चालकांना बसत आहे. सदरील रस्त्यावर मागील दहा वर्षापासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत आहे. हे पाणी आजुबाजुचा शेतात कित्येक दिवस थांंबुन याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

विशेषता या सर्व्हीस रोडवरुन येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अडकत आहे. सदरील काम दिलीप बिडकाँन कंपनीचे असल्याने रस्ते विकास मंञी यांनी या प्रकरणी लक्ष घालुन ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 
Top