तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर विकास आराखडा राबविताना आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगुन शहरात विकास कामे करा आम्ही विकास आराखड्याचे स्वागत करु असे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट)चे तालुका प्रमुख अमोल जाधव, शहरप्रमुख बापुसाहेब भोसले यांनी पञकार परिषद घेवुन केले.
या पञकार परिषदेत बोलताना जाधव भोसले म्हणाले कि, तिर्थक्षेञ तुळजापूर आराखडास आमचे नेते मुख्यमंत्री असताना विधमान मंञी तात्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुखमंञी एकनाथ शिंदे यांनी दिला होती. विकास आराखडा राबविताना आम्हाला विश्वासात घेतले सध्याचा विकास आराखडा मान्य नाही असे यावेळी स्पष्ट केले. शहरात मोठ्या प्रमाणात शासकिय जागा आहेत त्या अनेक ठिकाणी धुळखात पडुन असुन हा परिसर कचरा कुंड्या बनल्या आहेत. शासकिय जागा ताब्यात घेऊन येथे विकासकामे केले. तर भूसंपादनाचे शेकडो कोटीची बचत होणार आहे. यावेळी उपशहरप्रमुख उमेश चिवचिवे, गणेश नेपते, संभाजी नेपते, मोहन भोसले उपस्थितीत होते.