भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यात गेल्या आठवड्यापासून वादळी  वाऱ्यासह पावसाने धुवाधार हाजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळबागा सगळ्या हातच्या गेल्या आहेत. या भागाची कृषी अधिकाऱ्यां बरोबरच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी शासनाकडे वैयक्तिक पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास परांडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी शेतकऱ्यांना दिला.

प्रत्येक वर्षातला मे महिना पूर्णपणे कडक उन्हाळ्याचा असतो ,  तापमान जवळपास 40 ते 45 अंश वर जाते, उन्हाने अंगाची लाही लाही होते, प्रत्येकाला उकडा नकोसा वाटतो . साधारणपणे प्रत्येक वर्षातल्या जून महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात पावसाची प्रतीक्षा असते,  परंतु यावर्षी मात्र मे महिन्याच्या मध्यंतरापासूनच पावसाने सर्वत्र वादळी वाऱ्यासह मोठया प्रमाणात हजेरी लावली.

संपूर्ण पावसाळ्यामध्ये नदी नाले ओथंडून वाहून  पाणी पुरवठा करणारे तलाव,  बंधारे कधी भरतील याची अपेक्षा करावी लागते,  परंतु यावर्षी मात्र पावसाळा सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यात पडलेल्या पावसाने अशा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे, पुण्याच्या खडकवासला धरणात,  बिडच्या बिंदूसरा प्रकल्पात,  धाराशीवच्या मांजराचा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला, बिंदुसरा प्रकल्प अगदी भरून ओथंडून वाहू लागला . 

एवढेच नव्हे तर या पावसाने काढणीला आलेल्या  फळबागांची नासाडी झाली, हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतला आहे,  डोकं अगदी सुन्न होणारी स्थिती निर्माण झाली आहे,  शेतकरी हवालदील झाला आहे,  झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, 

शनिवार दि 31 मे 2025 रोजी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार देण्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी आणि भाजपचे भूम तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पथका मार्फत बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली,  वस्तुस्थितीची जाणीव करून घेतली,  प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी प्रत्यक्षात वस्तुस्थिती खरी असल्याचे दिसून आले . 

दरम्यान भूम तालुक्यातील साबळेवाडी येथील तानाजी साबळे यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या टरबूज फळबागेचा स्पॉट पंचनामा केला, प्रगतशील शेतकरी आबासाहेब मस्कर यांच्या शेतातील केळी व पपई फळबागेचे नुकसान झालेले संबंधित अधिकाऱ्याला निदर्शनास आणून दिले, 

तानाजी शिवाजी साबळे यांच्या गट न 117 क्षेत्र साडेतीन एकर क्षेत्रातील कलिंगडचे ्‌90 टक्के नुकसान झाले. खर्च 3 लाख रुपये मेहनत व औषध उपचारकरता केला होता, यातून जवळपास 100 टन माल निघणे अपेक्षित होते,  परंतु आता 10 टन माल निघेल की शंका आहे .  हा माल सुद्धा 4 रु प्रति किलो प्रमाणे विकला, 15 दिवसाचा वेळ मिळाला असता तर किमान 12 ते 15 लाख मिळाले असते , 90 दिवसाचे पिक होते,  कर्जबाजारीतून मुक्त होण्याच स्वप्न होत. परंतु तेही आता भंगले असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे .

याच शेतकऱ्यांचा गटनंबर 117 मध्ये कांदा 4 एकरकाढायला आला होता,  जागेवर सडला, 1000 पिशवी माल होता,  अंदोज खर्च 1 .5 लाख केला, उत्पन्‌‍ अपेक्षा 6  लाख होती . बालाजी  शिवाजी साबळे यांचे कलिंगड - 5 एकर  होते, त्यांचीही असीच गत झाली. एकूण क्षेत्र 10 एकर बागायतचे नुकसान झाली, मुळातच  विशेष म्हणजे खडकात जमीन तयार केली ,  लेवल करून तलावातील माती टाकून शेती केली होती . 

परमेश्वर निवृती वीर यांच्या ग न 247/अ - जनावराचा दगड मातीने बंदिस्त कोटा भिंत पडून गाय मयत झाली. दि 29 मे 2025 रोजीच्या दूर्घटनेत दुभती गाय ठार झाल्याने लहानग्या वासराची अन्‌‍ माय लेकराची ताटातूट झाली,  ओंकार राजेंद्र पवार यांच्या गट नंबर 431 मधील एक एकर क्षेत्रातील कांदा पिक पूर्णपणे बाधित झाले . खराब झाले . भुईमुगाचे वराह प्राण्यांनी नुकसान केले . थोडेफार भुईमुगाच्या शेंगा आलेल्या होत्या . त्यालाही वेळेत न काढता आल्यामुळे करे आले आहेत . 

या सर्व नुकसान भागाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची भूम मंडळाचे तलाठी प्रकाश पाटील व तालुका कृषी कार्यालय कर्मचारी श्रीमती स्वाती राऊत - कृषि सहायक  यांच्या समावेत जाऊन भाजपचे परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर शहराध्यक्ष बाबासाहेब वीर तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर खामकर अक्षय शेटे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत मासाळ शुभम खामकर बन्सी काळे सिद्धार्थ जाधव आदी पथकांनी पाणी केली . आणखी इतरत्र झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच तात्काळ पंचनामे करून पुढील कार्यवाही करावी अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली.

 
Top