धाराशिव (प्रतिनिधी)- समाज माध्यमावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जी माहिती व्हायरल केली आहे ती माहिती वस्तूस्थितीला धरून नाही. डीपीटीसीच्या निधीमध्ये अनियमिता व गैरप्रकार झाला होता म्हणून त्या निधीला मुख्यमंत्र्यांना पत्र देवून स्थगिती दिली होती. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
14 जून रोजी भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटील, ॲड. नितीन भोसले, युवराज नळे, सुनिल काकडे उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पालकमंत्री यांनी समाज माध्यमाला जी माहिती दिली ती चुकी आहे. सरकारमधील पालकमंत्री यांचा पक्ष मुख्य घटक पक्ष आहे. त्यामुळे डीपीडीसीच्या निधी संदर्भात 26 मार्च 2025 रोजी पालकमंत्री यांच्या दालनात भाजप नेत्यांनी व आम्ही भेट घेतली होती. परंतु पालकमंत्री यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. खरे तर पालकमंत्री यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्विकारले आहे. त्यामुळे चर्चा करणे आवश्यक होते. यावेळी पत्रकारांनी नेमका काय अनियमिता या निधीमध्ये झाला आहे असा प्रश्न विचारला असता सावरगाव येथील विकास संदर्भात जो निधी वाटप झाला आहे त्यात अनियमितता झाल्याचे नितीन काळे यांनी पत्रकारांना सांगितले.