तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील वडगाव लाख जवळ असणाऱ्या पुलाचा कठड्यास पिकअप थकडल्याने यात पिकअप मधील चार वर्षाचा चिमुकला मयत झाला. सदरील अपघात हा शुक्रवार दि. 30 मे रोजी पहाटे 02.30 वाजता घडला.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, लातुर जिल्हयातील औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील गिर परिवार आपल्या एमएच-24- एयु-5381 या पिकमधुन तुळजापूरकडे येताना तालुक्यातील वडगाव लाख जवळ येताच पिक अप पुलाचा कठड्याला थडकले यात अवधुत अनिल गिर वय 4 याचा मुत्यु झाला. तसेच नरोत्तम प्रेम गिरी 62, गीतांजली नरोत्तम गिरी 32 रा. पोमादेवी जवळगा हे गंभीर जखमी झाले असुन यात गिताजंली गिरी यांना पुढील उपचारार्थ धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.