धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एस.टी.) प्रमाणपत्र देण्यात यावे, या न्याय मागणीसाठी अनेक दशकापासून वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आंदोलने चालू आहेत. धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अनेक वेळा मोर्चे, उपोषण झाले आहेत. तरी शासन कसलीही दखल घेत नाही. यामुळे धनगर समाजात आक्रोश आहे. तरी त्यासाठी शासनाने योग्य भूमिका घ्यावी. यासाठी व धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे. या न्याय मागणीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सोमवार दिनांक 15 जुलै पासून करण्यात येणार आहे.

तरीही शासनाने निर्णय नाही घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल. त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शामसुंदर श्रीकांत तेरकर गावसुद, कमलाकर राजेंद्र दाणे -बेंबळी, राजू गौतम मंदाड-चोराखळी, समाधान युवराज पडळकर- येवती हे बांधव उपोषणास बसणार आहेत.  यावेळी समाज बांधव समाधान युवराज पडळकर, कमलाकर राजेंद्र दाने, बालाजी तिरकर, विठ्ठल खटके, अशोक गाडेकर, स्वप्निल सोनटक्के, संदीप वाघमोडे, बालाजी वगरे, शाम तेरकर, लिंबराज दादा डुकरे, आप्पा घायाळ, किशोर डुकरे, अमोल भोजने, सोमनाथ लांडगे, विजय रमेश सोनटक्के, अमोल जगन्नाथ मंदाड, इंद्रजीत देवकते आदी उपस्थित होते.

 
Top