उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील तिसऱ्या टप्यात निवडण्यात आलेल्या अंबेजवळगा गावामध्ये खरीप हंगामामाच्या पुर्व तय्यारी करिता शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी ,अभिमन्यु काशीद यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोयाबिन पिकाचे घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासणी करुनच वापरावे बियाणे पेरणीपुर्वी त्यास जैविक व रासायनिक बिजप्रक्रिया करावी.पेरणी बी.बी.एफ.यंत्रानेच करावी.पहिली फवारणी निंबोळी अर्काची करावी अशी माहिती प्रात्यक्षिकासह दिली.शेतकऱ्यांनी उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच उत्पन्न खर्च कमी करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

  पोक्रा योजने अंतर्गत फळबाग लागवड,रेशीम उद्योग,बांबू लागवड,विहिर पुणर्भरण बाबत माहिती प्रकल्प विशेषज्ञ, सचिन पांचाळ यांनी दिली. शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातुन औजार बँक,प्रक्रिया उद्योग यांची स्थापना करण्याविषयी प्रकल्प विशेषज्ञ नेताजी चव्हाण यांनी माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय मोहिती व तानाजी हिप्परकर, कृषी सहाय्यक माजीद शेख व धवल शिणगारे, यांनी प्रत्यक्षिक करुन दाखविले.यावेळी 20 शेतकरी उपस्थित होते.संपुर्ण कार्यक्रम दरम्याने सोशल डिस्टसिंग,मास्क,सॅनिटायझर या करोना प्रतिबंधक उपाययोजना यांचा अवलंब केला आहे.   

 
Top