उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणा-या भारत सरकार शिष्यवृत्ती , शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठयक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे  2021-22 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे, तेव्हा ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला नसेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत , असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरावत यांनी केले आहे.

      उस्मानाबाद जिल्हयातील अनुसूचित जाती, विमुक्तजाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीमध्ये  शिष्यवृत्तीचे अर्ज संकेतस्थळावर  भरून ते ऑनलाईन पध्दतीने आणि ऑफलाईन (हार्डकॉपी) पध्दतीने आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावयाचे आहेत.

  उस्मानाबाद जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी हे अर्ज सहायक आयुक्त  कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी छाननी करून शिष्यवृत्तीस पात्र असणा-या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज कार्यालयास दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. आपल्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती, विमुक्तजाती, भटक्याजमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. 28 फेब्रुवारी 2022 हा अर्ज भरण्यासाठीचा अंतिम दिनांक असल्याने त्या दिनांकापर्यंत अर्ज सादर न केल्यास व त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याससामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत.असे  सहाय्यक आयुक्त समाजकल्याणच्या श्री.अरावत यांनी स्पष्ट केले आहे.      

 
Top